नमस्कार मंडळी ,
राम राम,
छत्रपती शिवाजी महाराज हे महान व्यक्तिमत्त्व !!! त्यांच्याबद्दल ऐकल्यावर, वाचल्यावर , चित्रपट पाहिल्यावर एक गोष्ट मात्र कळून चुकली कि,
मग त्यात कमी उंचीच्या मावळ्यासाठी जास्त लांबीच्या तलवारी बनवणे, जमिनीखाली कमी खोलीवर पाणी शोधण्याची पद्धत , मोठमोठाले दगड अगदी सोप्यापद्धतीने फोडण्याची कला, निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूपासून हत्यारे तयार करण्याचे ज्ञान या व अशा अनेक अफलातून युक्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धूर्तपणे स्वराज्यस्थापनेत अंमलात आणल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळातल्या ENGINEERING चं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी अगदी उत्कृष्टरित्या वर्णन केलेले आहे आणि जर तुम्हाला खरंच ते समजून उमजून घ्यायचा असेल तर ही चित्रफीत नक्की पहा थोडी लांबी जास्त आहे चित्रफितीची पण गरजेची आहे.
अहो,स्थापत्यशास्त्राबद्दल बोलायचं म्हटलं तर हिरोजी इंदूलकरांनी रायगडसारख्या अशक्य किल्ल्याची बांधणी करून भल्याभल्यांना भुवया उंचवायला भाग पाडलं. फक्त रायगडच काय तर राजगड, पन्हाळगड, हरिहरेश्वर असे अनेक किल्ले मी पाहिलेले खूपच मनमोहक आणि चित्तथरारक !!!

आता काय, ENGINEERING मध्ये लेखी परीक्षेच्या नावाखाली पोपटपंची करायची आणि प्रात्यक्षिक च्या नावाखाली प्रयोगवह्या भरायच्या बाकी काय नाय. ढकलत ढकलत पुढे जायचं.
असो तुम्हाला एक सांगणं आहे , एखादवेळी सुट्टी वैगेरे असल्यावर गडकिल्ल्यांना भेट देत चला.हो पण तिथे गेल्यावर त्या ऐतिहासिक वास्तूला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या ओ.
एक गोष्ट खरी ...
राम राम,
छत्रपती शिवाजी महाराज हे महान व्यक्तिमत्त्व !!! त्यांच्याबद्दल ऐकल्यावर, वाचल्यावर , चित्रपट पाहिल्यावर एक गोष्ट मात्र कळून चुकली कि,
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ !!!
अशाच एका पेक्षा एक युक्त्या लढवून महाराजांनी महाबलाढ्य सत्तांना धूळ चारली, स्वराज्य स्थापन केले. याकाळा मध्ये त्यांनी बऱ्याच तंत्रज्ञानाचा, कौशल्याचा वापर केला. कधी कधी वाटत त्या काळातील काही पद्धती आतापेक्षा दोन पाऊले पुढेच होत्या.मग त्यात कमी उंचीच्या मावळ्यासाठी जास्त लांबीच्या तलवारी बनवणे, जमिनीखाली कमी खोलीवर पाणी शोधण्याची पद्धत , मोठमोठाले दगड अगदी सोप्यापद्धतीने फोडण्याची कला, निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूपासून हत्यारे तयार करण्याचे ज्ञान या व अशा अनेक अफलातून युक्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धूर्तपणे स्वराज्यस्थापनेत अंमलात आणल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळातल्या ENGINEERING चं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी अगदी उत्कृष्टरित्या वर्णन केलेले आहे आणि जर तुम्हाला खरंच ते समजून उमजून घ्यायचा असेल तर ही चित्रफीत नक्की पहा थोडी लांबी जास्त आहे चित्रफितीची पण गरजेची आहे.
अहो,स्थापत्यशास्त्राबद्दल बोलायचं म्हटलं तर हिरोजी इंदूलकरांनी रायगडसारख्या अशक्य किल्ल्याची बांधणी करून भल्याभल्यांना भुवया उंचवायला भाग पाडलं. फक्त रायगडच काय तर राजगड, पन्हाळगड, हरिहरेश्वर असे अनेक किल्ले मी पाहिलेले खूपच मनमोहक आणि चित्तथरारक !!!

बा रायगड
असो तुम्हाला एक सांगणं आहे , एखादवेळी सुट्टी वैगेरे असल्यावर गडकिल्ल्यांना भेट देत चला.हो पण तिथे गेल्यावर त्या ऐतिहासिक वास्तूला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या ओ.
एक गोष्ट खरी ...
छत्रपती शिवाजी महाराज !! ग्रेट ENGINEER !! MANAGEMENT गुरु !!!
Comments
Post a Comment